Tiranga Rally | नगरमध्ये सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली संपन्न
नगर-नगरमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करून नऊ तळ उद्ध्वस्त केले.
भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्यच आहे म्हणूनच नगरकरांच्या मनात देशाबद्दल व सैन्याबद्दल असलेली भावना आणखीन दृढ करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पूर्व नौसैना अधिकारी अनिल जोशी, माजी नौदल अधिकारी राहुल जाधव, नौदल अधिकारी संजय पाटेकर, मेजर निळकंठ उल्हारे, मेजर गोरख पालवे, मेजर शिवाजी पालवे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,सचिन पारखी, प्रशांत मुथ्था ,
गोपाळ वर्मा , सीए राजेंद्र काळे, संजय आडोळे, , सुनिल रामदासी, भैय्या गंधे, दामोदर बठेजा, धनंजय जाधव, पं महेश गुगळे, संजय ढोणे, अनिल शिंदे, सुरेखा कदम, शिलाताई शिंदे, सुरेखा विदये, मयुर बोचुघोळ, करण कराळे, संपत नलावडे, कैलास गर्जे, ज्ञानेश्वर धिरडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व महिला मुले उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस प्रारंभ झाला. सावरकर चौक, चितळे रोड, नेता सुभाष चौक, तेलीखुंट, इमारत कंपनीतील टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कापडबाजार येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
या रॅलीत अहिल्या नगर वासीय सहभागी झाले होते. रॅलीत प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा होता. तसेच १० ० फुटी झेंडा हे या रॅलीचे मुख्य आकषण होते.तर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com