Snehalay | भाऊबीज निमित्ताने वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी माहेरची साडी प्रेमाची उब | उमेश महाराज

 Snehalay | भाऊबीज निमित्ताने वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी माहेरची साडी प्रेमाची उब | उमेश  महाराज

Snehalay | भाऊबीज निमित्ताने वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी माहेरची साडी प्रेमाची उब | उमेश  महाराज







  नगर , 


देशातील  न्यायालयांमधील  प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने अत्याचारग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटीबद्द असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव न्यायमूर्ती  कृष्णाजी सोनवणे यांनी केले.



तर दिवाळीतील भाऊबीज निमित्ताने वंचित महिलांना अनामिक भावांकडून दिली जाणारी माहेरची साडी प्रेमाची उब आणि जगण्याची आशा देत असल्याचे प्रतिपादन जगद्गुरु तुकोबारायांच्या वंशज यांनी स्नेहालयात आज केले.







देहू येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प जालिंदर महाराज मोरे,  विश्वस्त ह भ प उमेश महाराज मोरे, अभंग प्रतिष्ठानचे संस्थापक विकास कंद  आदींच्या प्रमुख उपस्थितीत  20 वा "माहेरची साडी "हा उपक्रम स्नेहालय संस्थेत आज संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान न्या .सोनवणे यांनी भूषवले.





देह व्यापारातील बळी, मानसिक विकारग्रस्त , शहरी आणि ग्रामीण कष्टकरी , परित्यक्ता - विधवा आणि एकल अशा  सुमारे 3500 महिलांशी आणि तृतीय लिंग पंथीयांशी यंदाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहृदय भावांनी बहिणीचे नाते जोडले. आपल्या या मानलेल्या बहिणींना नवीन साडी, दिवाळीचा फराळ, आनंदाची शिदोरी भावांतर्फे  देण्यात आली. अनामिक भावांनी जोडलेल्या या भावनिक नात्याने सर्वच महिला गहिवरल्या.




पुणे जिल्ह्यातील देहू येथील अभंग प्रतिष्ठान , तळवडे  येथील ज्ञानगंगा सोशल फाउंडेशन, देहूचे  आत्मदीप फौंडेशन, . स्वातीज मेडीसर्च फौंडेशन , या उपक्रमाची स्थापना करणारे समाजसेवक स्व. धर्मराज आवटी गुरुजी यांचा परिवार आणि स्नेहालय परिवाराने या उपक्रमासाठी साडी ,फराळ इत्यादींचे संकलन केले.


जे का रंजले.. गांजले


यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज असलेले  उमेश  महाराज मोरे म्हणाले की, कुटुंब आणि गाव सुटलेल्या एकल महिलांसाठी मदत देण्यापेक्षा सुद्धा त्यांच्याशी भावनेचे नाते जोडणे अनमोल असते . माणसाचा जगण्याचा आधार हा प्रेम आणि आपुलकीच असतो. माहेरच्या साडी या उपक्रमातील साडीसोबत येणारा नात्यांचा बंध महिलांना जगण्याची नवी उमेद देणारा आहे.





 देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे म्हणाले की,धर्मग्रंथ वाचून ,त्याचे पारायण करून किंवा कर्मकांडाचे आचरण करून कोणीही धार्मिक होत नसतो.विचार आणि वर्तनातून माणुसकी व्यक्त होणे  आणि सारे भेदाभेद भ्रम अमंगळ हे उमगणे ,हेच धार्मिकतेचे अस्सल प्रमाण असल्याचे प्रतिपादन ह भ प उमेश महाराज मोरे यांनी यावेळी  केले.








स्नेहालय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती जया जोगदंड यांनी प्रास्ताविकात नमूद केले की, दोन दशकांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते असलेले निवृत्त शिक्षक धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी माहेरची साडी हा उपक्रम सुरू केला. घरोघर जाऊन एकल महिलांची दुःख सांगून त्यांच्याशी नाते जोडण्यासाठी त्यांनी भाऊ शोधले. दीड वर्षांपूर्वी गुरुजींचे निधन झाले. परंतु त्यानंतर अनेक सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन हा वारसा टिकवला.
                     



      अभंग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विकास कंद म्हणाले की, ज्ञानेश्वर आणि तुकारामांसह सर्व संतांनी वंचितांचे दुःख वाटून घेण्यालाच खरे धर्म आणि अध्यात्म मानले. माहेरची साडी उपक्रमात देहू परिसरातील 3500  पेक्षा जास्त भावांनी  वस्त्र सहयोग दिला.  माहेर हरवलेल्या बहिणींना त्यामुळे मनाला उभारी देणारे गणगोत  मिळाले. त्यामुळे या साडीचा सर्व बहिणी  अभिमानाने स्वीकार आणि परिधान दिवाळीत करतात.





यावेळी रंजना रणनवरे, जया जोगदंड, शोभा रोठे  आदींनी  प्रातिनिधिक स्वरुपात  भावना व्यक्त केल्या.माहेरची साडी केवळ वस्त्र नसून जगण्याची उमेद आणि  आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.





यावेळी  मयूर मोरे,  डॉ. स्वाती आजबे, अनिकेत काळोखे, मळूराज धर्मराज औटी,  जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव,  अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश लक्ष्मण  खाडे , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या अँड. भक्ती शिरसाठ ,देहूचे सर्वश्री गणेश साळुंखे, अजिंक्य साकोरे, विजय ठाणगे, संतोष भसे, सागर मोरे , सचिन लिंबोरे, वैभव काळोखे, विजय मोरे,  सचिन काळोखे, सचिन कुंभार, वसंत भसे ,निलेश मिरजकर, सुरेश गाडे , नारायण पचपिंड, वसंत भसे, निलेश मिरजकर आणि श्रीमती निर्मला बलसेकर यांना गौरविण्यात आले.




कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्वाती रानडे यांनी केले.नगर जिल्ह्यातील सर्व एकल अत्याचारित महिलांचा शोध घेण्यासाठी दीपक बुरम, प्रविण बुरम, अंबादास शिंदे, मजहर खान, मुस्ताक पठाण, विशाल कापसे, अजय वाकडे, सविता कारंडे, मीना पाठक , आशा डोईफोडे,  वनमाला कराळे यांनी विशेष परिश्रम घेतले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या