Nivedan Nagar | शरद पवार यांच्यावरील जिल्हाबंदी मागे घ्यावी : खा निलेश लंके

 चिचोंडी पाटील सरपंच शरद पवार यांच्यावरील जिल्हाबंदी मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा,महाविकास आघाडीची मागणी - खा निलेश लंके 

Nivedan Nagar | शरद पवार यांच्यावरील जिल्हाबंदी मागे घ्यावी : खा निलेश लंके





        नगर-चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद  पवार यांच्यावर झालेली जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. 




         यावेळी  शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडेजिल्हा परिषद मा उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळकेसदस्य बाळासाहेब हराळ,संपतराव म्हस्केमा सभापती प्रवीण कोकाटेकाँग्रेस चे अध्यक्ष अरुण म्हस्के बाबासाहेब गुंजाळ,  राजेंद्र भगतडॉ. मारुती ससेआबासाहेब कोकाटेप्रकाश पोटे,  आदींसह महाविकास आघाडीचे नेतेपदाधिकारीकार्यकर्ते व चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



         निवेदनात म्हटले आहे कि सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. 22 ऑगस्ट 2025 रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण व बोगस अर्जांच्या आधारे अपात्र ठरविण्यात आले. गटविकास अधिकारी यांच्या अहवालात ना जागेची अतिक्रमण नोटीसना हद्द निश्‍चितीना कोणतेही ठोस पुरावे होतेतरी सरपंचावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.




     त्यानंतर 19 सप्टेंबर 2025 रोजी पोलिस उपविभागीय अधिकारीनगर ग्रामीण उपविभागअहिल्यानगर यांच्याकडून पवार यांना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली. 24 सप्टेंबर 2025 रोजी या संदर्भात सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती. दिलेल्या निवेदनात म्हटले कीशरद पवार यांनी मागील 10 वर्षांत ग्रामपंचायत सदस्यउपसरपंचसरपंच पदावर कार्य केले असून समाजकारणात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी बाजार समितीपंचायत समिती निवडणुका लढवून शेतकऱ्यांचेसर्वसामान्यांचे प्रश्‍न आंदोलनातून शासन दरबारी मांडले. त्यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी राजकीय दबाव टाकून अधिकारीमार्फत ही बोगस कारवाई घडवून आणली आहे. 




         सत्ताधारी व प्रशासन खऱ्या शेतकरी समस्यांकडे (अतिवृष्टीआत्महत्याशेतीचे नुकसान) दुर्लक्ष करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सदर दोन्ही कारवाया त्वरित मागे घ्याव्याततसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दाखल होणारे बोगस गुन्हे व कारवाया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.




            अहिल्यानगर जिल्ह्यात सात ते आठ दिवसापासून सर्वत्र मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामध्ये विशेषतः नगरपारनेरकर्जत-जामखेडशेवगाव-पाथर्डी आदी तालुक्यांमध्ये मुसळधार व संतत धार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक प्रकल्प व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी नाल्यांच्या काठावरील शेतीला अक्षरश: तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहेत.



 शेतकऱ्यांच्या शेतात दोन ते तीन फूट उंचीपर्यंत पाणी साचले असूनपीक पूर्णता पाण्याखाली गेले आहे. ओढे-नाळे भरून वाहत असूनवाड्या वस्तींना जोडणारे छोट-मोठे पूल वाहून गेले आहेत. जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दळणवळणाचा प्रश्‍न बिकट बनला आहे. 



या परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थ हतबल झाले असूनउपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना तातडीने मदत देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या