अॅड. मीरताज शेख यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर न्यायालयाचा निर्णय
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अजय देविदास परदेशी यांनी ₹४,५०,०००/- रकमेच्या कथित हात उसन्या व्यवहारावरून चेक बाऊन्स झाल्याचा आरोप करत अहमदनगर येथील मा. न्यायालयात फौजदारी खटला क्रमांक SCC 493/2024 दाखल केला होता.
या प्रकरणात आरोपी शमशेर जोगिंदर सिंग यांच्या वतीने अॅड. मीरताज जी. शेख यांनी बाजू मांडली. प्रकरणातील कागदपत्रे, उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करून त्यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद केला. तसेच साक्षीदारांच्या उलटतपासणी दरम्यान महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करत फिर्यादीच्या दाव्यातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
अॅड. शेख यांच्या चोख कायदेशीर मांडणी, पुराव्यांचे प्रभावी विश्लेषण आणि उलटतपासणीमुळे फिर्यादीच्या दाव्याबाबत न्यायालयासमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. या सर्व बाबींचा विचार करून मा. न्यायालयाने फिर्यादीची तक्रार फेटाळून लावत दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी शमशेर जोगिंदर सिंग यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता (Acquittal) केली.
या प्रकरणातील निकाल हा कायद्याचा सखोल अभ्यास, ठोस पुराव्यांची मांडणी आणि प्रभावी न्यायालयीन युक्तिवादाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com