Uposhan | मशिदींवरील भोंगे काढावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  उपोषण सुरु

Uposhan | मशिदींवरील भोंगे काढावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  उपोषण सुरु

 




       Uposhan |  नगर -नगर जिल्ह्यात सुरु असलेले गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करून बंद  करावेत तसेच सर्व मशिदींवरील भोंगे तात्काळ काढून टाकावेत यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आमरण उपोषण सुरु करण्यात आले, 



उपोषणात  कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, मढीचे सरपंच संजय मरकड,कालिदास महाराज घोडके,सुंदरनाथ महाराज, कानिफनाथ  आखाडा, सुथबीरनाथ महाराज, सुखवीरनाथ  महाराज,सोपाननाथ महाराज,सोमनाथ महाराज,मच्छिंद्र वेताळ,रमेश मरकड हे उपोषणाला बसले आहेत.

 



         सरपंच मरकड म्हणाले की, आपण ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देवून जिल्ह्यात सुरु असलेले गोवंशीय जनावरांचे अवैध कत्तलखाने बंद करून उध्वस्त करावेत तसेच सर्व मशिदींवरील भोंगे तात्काळ काढून टाकावेत, अशी मागणी केली होती. 


त्यावेळी ही आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु प्रशासनाने १० दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १६ मे व २ जून रोजी पुन्हा स्मरणपत्रे दिली. परंतु त्यावर आज रोजी पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.



        मशिदीवरील भोंग्यांची परवानगी घेतली जात नाही. भोंग्यांच्याकर्णकर्कश आवाजामुळे सर्व समाजातील धर्मातील लोकांना त्याचा त्रास होतो, विविध ठिकाणी, शाळा, महाविद्यालये, दवाखाने, हॉस्पिटलच्या शेजारी मोठ्या आवाजात दिवसातुन पाच वेळा नमाज पठण केले जात असल्यामुळे सर्वांवर त्याचा परिणाम होत असुन ते तात्काळ काढुन टाकण्यात यावे.



 तसेच महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना सुध्दा तसेच राज्य शासनाने नुकताच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असताना देखील वारंवार हिंदु समाजाच्या आराध्य दैवत असणाऱ्या गोमातेची सर्रास पणे कत्तल जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैधपणे चालु असुन त्यांच्यावर कारवाई करून ती कायम स्वरुपी बंद करून जमिनदोस्त करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.



          आज पहिल्या दिवशी उपोषणाला कृणाल भंडारी,अक्षय शिंदे, साहिल पवार, राहुल म्हेत्रे,चंद्रकांत जाधव,हिंदुराष्ट्र सेनेचे संजय आडोळे, सुकळीचे सरपंच लहू भवर,उपसरपंच संदीपराव गालफडे,सरपंच अंबादास ढाकणे आदींसह अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी  भेट दिली मागणी मान्य झाली नाहीतर मोठया संख्नेने तर कानिफनाथ आखाड्यातील साधु महंत, हिंदु गोरक्षक व सकल हिंदु बांधव मागणी मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसतील असे  सरपंच मरकड यांनी सांगितले.